Mahamrityunjay Mantra in Marathi महामृत्युंजय मंत्राचे महत्व आणि जपाचे लाभ

महामृत्युंजय मंत्र हा महादेवांना प्रसन्न करण्याचा सर्वोत्तम उपाय मानला जातो. हा मंत्र श्री शंकराचा महामंत्र आहे, ज्याचा उल्लेख वसिष्ठ ऋषींनी श्री मृतसंजीवन स्रोतात केला आहे. योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली या मंत्राचा जप करणं अत्यावश्यक आहे, कारण या मंत्रामध्ये काही विशेष योगिक क्रिया असतात, ज्याचा प्रभाव योग्यरीत्या साधण्यासाठी गुरुंच्या ज्ञानाची गरज असते.

महामृत्युंजय मंत्र:

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥

या मंत्राचा अर्थ असा आहे की, हे प्रभू, आम्हाला मृत्यूच्या चक्रातून मुक्त करा आणि अमरत्व प्राप्त करण्याचा आशीर्वाद द्या. जसे काकडी पक्व झाल्यावर वेलापासून वेगळं होतं, तसंच आम्हालाही या संसारातून मुक्त करून आपल्या चरणी स्थान मिळू दे.

महामृत्युंजय मंत्राचे महत्व:

महामृत्युंजय मंत्र अत्यंत प्रभावशाली मानला जातो. या मंत्राच्या जपाने साधकाच्या शरीराभोवती एक अदृश्य दिव्य कवच निर्माण होते. हे कवच साधकाला सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण करतं आणि यश प्राप्तीसाठी मदत करतं. या कवचामध्ये ३३ देवता आहेत, ज्यांना मंत्रातील ३३ अक्षरांद्वारे दर्शवलं जातं.

महामृत्युंजय मंत्राचे विविध प्रकार:

  1. एकाक्षरी मंत्र – ‘हौं’: याचा जप निरोगी आरोग्यासाठी केला जातो.
  2. त्रयक्षरी मंत्र – ‘ॐ जूं स:’: साधारण आजारांपासून मुक्त होण्यासाठी जप केला जातो.
  3. चतुराक्षरी मंत्र – ‘ॐ हौं जूं स:’: शल्यचिकित्सा किंवा दुर्घटनांपासून रक्षणासाठी.
  4. दशाक्षरी मंत्र – ‘ॐ जूं स: माम पालय पालय’: अमृतमृत्युंजय मंत्र म्हणतात, जो दीर्घायुष्यासाठी केला जातो.

महामृत्युंजय मंत्र केव्हा जपावा?

  • एखाद्या व्यक्तीला वारंवार अपघात होत असतील किंवा सतत आजारी असेल तर.
  • घरातील प्राणी किंवा वनस्पती अचानक मरत असतील तर.
  • नकारात्मकता किंवा भीती सतत जाणवत असेल तर.
  • सतत चिंता भेडसावत असल्यास.

संबंधित लेख

महामृत्युंजय मंत्र जपाची काळजी:

  • मंत्रजप शिवलिंगाजवळ केल्यास विशेष लाभ होतो.
  • मंत्रजप करताना ब्रह्मचर्याचं पालन करणं आवश्यक आहे.
  • मंत्रोच्चार शुद्ध असावा आणि शांत चित्ताने मंत्र जप करावा.
  • मंत्रजपासाठी रुद्राक्षाच्या माळेचा वापर विशेष फलदायी मानला जातो.

महामृत्युंजय मंत्र जपाचे लाभ:

  • मृत्युशय्येला खिळलेल्या व्यक्तींनाही नवीन जीवन प्राप्त होण्याची शक्यता असते.
  • दुष्ट शक्तींनी त्रस्त व्यक्तींना संरक्षण मिळतं.
  • शरीरातील आजार दूर होऊन नवचैतन्य निर्माण होतं.
  • मानसिक भीती दूर होऊन सकारात्मक विचारांचा उदय होतो.

त्र्यंबकेश्वरमध्ये महामृत्युंजय जप का करावा?

त्र्यंबकेश्वर हे जगातील एकमेव स्थान आहे जिथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची संयुक्त आराधना केली जाते. त्यामुळे इथे केलेला महामृत्युंजय मंत्राचा जप तात्काळ परिणामकारक ठरतो. त्र्यंबकेश्वर येथील पवित्र गौतमी गंगेच्या तीरावर केलेल्या विधींना विशेष महत्त्व आहे. महामृत्युंजय मंत्राचा जप योग्य गुरुंच्या मार्गदर्शनाखाली करावा, ज्यामुळे साधकाच्या सर्व इच्छांची पूर्तता होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top